Sunday, April 8, 2018

जीवन त्यांना कळले हो !





जीवन त्यांना कळले हो !


“जीवन त्यांना कळले हो , मीपण ज्यांचे पक्वफळापरी सहज पणाने गळाले हो”
किती सुंदर आणि माधुर्यपूर्ण रीतीने कविवर्य बा.भ.बोरकर यांनी जीवनाचे मूल्य व सार कशात दडलंय हे वरील ओळीत मांडलय.आज अनेक वर्षानंतर देखील हि कविता सर्वसामान्यांच्या मनावर राज्य करतेय. का? तर किवितेत कवीने मांडलेली भावना,कल्पना व ह्रिदयाला भिडणाऱ्या विचारांमुळे. हि कविता म्हणजे खर तर त्यांचा गौरव आहे ज्यांनी निर्लोभी, निस्वार्थी बुद्धीने आपल पूर्ण आयुष्य दीन,दुबळे ,अपंग,अनाथ ह्यांच्यावर छत्र होऊन त्यांना साऊली देण्यात आणि स्वतः मात्र बहिष्कार,अपमान या सारख्या उन्हाचे चटके खात घालविले त्या थोरांचा गौरव म्हणजे हि कविता आहे .
 आज आपल्यातील बहुतेकांना हेच वाटत की आपण सुखी म्हणजे जग सुखी ; इतरत्र घडणाऱ्या गोष्टी ह्या आपल्यासाठी शुल्लक असतात कारण त्या आपल्याशी संबंधित नसतात. आणि आपल्या दुःखाचा अवडंबर पण एवढा माजवत फिरतो की ह्याहून तुडुंब दुखात संपूर्ण आयुष्य झीझवलेली माणसे  देखील अस्तित्वात आहेत ह्याचा पूर्णपणे आपल्याला विसर पडतो. T.V  वर च्या बातम्यातून, वृत्तपत्राद्वारे आपण जेव्हा माणुसकीला काळिमा फासणारी हिंसक बातमी ऐकतो किव्हा वाचतो तेव्हा केवळ चारचौगात त्याबद्दलची आपली पोकळ प्रतिक्रिया देणे आणि त्यावर टीका किव्हा शोक व्यक्त करून ती गोष्ट केवळ त्यापुरती मर्यादित ठेवून आपल्या आयुष्यात पुन्हा रमून जाणे एवढेच आपणाला जमते ह्याला अपवाद देखील आहेच काही बिनसरकारी  संस्था (N.G.O.s ) ह्याद्वारे दुर्घटनाग्रस्त, पूरग्रस्त लोकांना मदात करण्यासाठी खूप धडपड केली जाते. पण समाजात काही अशी माणसे देखील आहेत ज्यांना स्वतःच्या कष्टा पेक्षा दुसऱ्याच्या डोळ्यातील अश्रू अतीव दुखः देतात. आणि अशी माणसे  केवळ हातावरच्या बोटांवर मोजण्या इतकीच सापडतात.
             कुष्टरोग्यांची सेवा करून त्यांच्या आयुष्याचे  आनंदवन निर्माण करणारे बाबा आमटे आणि त्यांचाच पाऊलावर पाउल ठेऊन चालणारे डॉ.प्रकाश बाबा आमटे व डॉ.विकास बाबा आमटे ; खर तर डॉक्टरकीची पदवी घेऊन आपला व्यवसाय थाटून ऐषोरामात आयुष्य जगणे त्यांना सहज शक्य होत, अनाथांची माता असणाऱ्या मदर तेरेसा व सिंधुताई सपकाळ ज्यांच्या आयुष्यात शिक्षणाचा गंध देखील नाही पण सामाजिक भान आहे  , राष्ट्रसंत गाडगे बाबा स्वच्छता व मानवतेचे साधक, समाजाकडून पराकोटीचा विरोध व बहिकाष्कार होत असताना देखील अपमान सहन करून स्त्रियांसाठी शिक्षणाची वाट मोकळी  करून देणारे  महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले ...खर तर नावे  घेऊन देखील संपणार नाही एवढी मोठी यादी ह्या सर्व महात्म्यांची आहे .जशी यादी मोठी तशी त्यांची कार्ये देखील प्रशंसनीय आहे .
खर तर आपले आदर्श हे चित्रपटातले नायक  किंवा नायिका नसून हि लोक आहेत जी इतरांसाठी जगतात आणि इतारांसाठी मारतात. ‘ मरावे परी किर्तीरूपे उरावे’ हि उक्ती ह्यांना शोभते. आणि म्हणूनच जरी जगात हिंसक, मारक व वाईट गोष्टींच्या प्रमाणात वाढ जरी झाली तरीही ह्या महात्म्यांच्या अस्तित्वामुळेच जगण्याची अशा मिळते व काही चांगल करण्याची प्रेरणा मिळते.





13 comments: